उत्तर भारतात गारठा निर्माण झाल्याने राज्यात थंडी परतण्याची चिन्हे

गावशिवार न्यूज | पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यातील थंडीचे प्रमाण काही दिवसांपासून कमी झाले होते. मात्र, उत्तर भारतात पुन्हा गारठा निर्माण झाल्यानंतर आपल्याकडेही आता थंडी परतण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्यभरात सध्या रात्रीचे किमान तापमान हे 15 ते 20 अंशाच्या दरम्यान स्थिर आहे. त्यात घट झाल्यानंतर थंडीचा कडाका वाढू शकणार आहे. (Weather Update )

शुक्रवारी (ता.12 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
अहमदनगर- 28.0/15.6, जळगाव- 30.0/16.5, कोल्हापूर- 31.1/18.6, महाबळेश्वर- 27.1/15.8, मालेगाव- 29.4/17.2, नाशिक- 30.4/17.4, सांगली- 31.7/19.1, सातारा- 30.8/16.1, सोलापूर- 34.6/17.5, अकोला- 32.2/17.8, अमरावती- 30.0/17.0, बुलडाणा- 29.4/16.4, चंद्रपूर- 30.8/16.4, गडचिरोली- 30.2/16.0, गोंदिया- 28.3/15.6, नागपूर- 29.2/17.1, वर्धा- 31.0/18.0, वाशिम- 30.8/15.8, यवतमाळ- 33.0/19.0, छत्रपती संभाजीनगर- 29.4/16.0, बीड- 30.6/17.0, नांदेड- 31.0/18.6, परभणी- 31.4/16.5, डहाणू- 28.4/20.8, मुंबई- 32.8/23.6, रत्नागिरी- 34.2/21.2

WhatsApp Group
Previous articleदेशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर
Next articleऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी 62 वसतिगृहे सुरू करण्यास शासनाची मान्यता