गावशिवार न्यूज | उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक तसेच अहमदनगर आदी जिल्हे थंडीमुळे चांगलेच गारठले आहेत. पैकी जळगावमध्ये मंगळवारी (ता.16) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून घेण्यात आली. दरम्यान, कोकण किनारपट्टीचा भाग वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे किमान तापमान 15 अंशाच्या खाली आले आहे. वाढत्या थंडीचा फायदा उशिरा पेरणी झालेल्या रब्बी पिकांना होऊ शकेल. (Weather Update)
मंगळवारी (ता.16 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 30.4/9.4, अहमदनगर- 28.8/9.6, कोल्हापूर- 31.7/16.9, महाबळेश्वर- 26.8/14.7, मालेगाव- 27.8/11.4, नाशिक- 29.3/9.8, सांगली- 32.1/15.8, सातारा- 31.3/12.4, सोलापूर- 33.7/14.5, अकोला- 30.6/12.3, अमरावती- 29.4/13.5, बुलडाणा- 28.5/12.6, चंद्रपूर- 30.6/14.4, गडचिरोली- 31.4/14.2, गोंदिया- 29.8/12.4, नागपूर- 30.0/14.2, वर्धा- 31.0/14.0, वाशिम- 32.4/14.0, यवतमाळ- 32.0/11.5, छत्रपती संभाजीनगर- 29.2/9.2, नांदेड- 30.2/14.0, परभणी- 30.6/13.5, डहाणू- 28.3/15.5, मुंबई- 31.5/18.8, रत्नागिरी- 32.6/16.3