राज्यात किमान तापमानात घट होण्यासाठी आवश्यक पोषक वातावरणाची निर्मिती

गावशिवार न्यूज | पावसाळी वातावरण तयार झाल्याने राज्यातील थंडीचा गारठा काही दिवसांपासून कमी झाला होता. मात्र, किमान तापमानात घट होण्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक वातावरणाची निर्मिती आता होत असून त्यामुळे थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता बळावली आहे. हवामान विभागाने देखील त्यास पुष्टी दिली आहे. थंडीचे प्रमाण वाढल्यानंतर त्याचा मोठा फायदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांना होऊ शकणार आहे. (Weather Update )

शनिवारी (ता.13 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
अहमदनगर- 29.2/15.4, जळगाव- 30.1/16.8, कोल्हापूर- 31.5/18.2, महाबळेश्वर- 26.8/16.6, मालेगाव- 29.8/17.6, नाशिक- 30.4/15.7, सांगली- 32.0/16.9, सातारा- 32.2/15.5, सोलापूर- 34.5/20.9, अकोला- 32.3/18.4, अमरावती- 30.2/17.1, बुलडाणा- 30.8/17.0, चंद्रपूर- 30.6/17.0, गडचिरोली- 30.0/16.6, गोंदिया- 28.8/15.0. नागपूर- 30.1/16.6, वर्धा- 30.5/17.5, वाशिम- 30.8/15.4, यवतमाळ- 31.7/15.5, छत्रपती संभाजीनगर- 29.6/15.6, परभणी- 31.3/17.3, डहाणू- 29.5/20.4, मुंबई- 34.2/23.0, रत्नागिरी- 35.4/20.2

WhatsApp Group
Previous articleइंडियन ऑईल देशभरात लवकरच ‘इतके’ इथेनॉल पंप सुरू करणार
Next articleएकरी 150 टन ऊस उत्पादन घेणारी महिला ऊसभूषण पुरस्काराची मानकरी